पॉप्युलर होताच बदलले राघवचे तेवर, लग्नाबाबत ठेवली मोठी अट, शहनाजसोबत रोमान्सची चर्चा

राघव जुयालचा सिनेमा खूप पसंत केला जात आहे. 'किल' मध्ये राघवचं जोरदार कौतुक होत आहे.

आताच्या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याला, तू प्रेमात आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला.

Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, हो मी प्रेमात आहे. मी कायमच प्रेमात असतो. 1992 पासून मी प्रेमातच आहे. एवढं बोलून तो हसू लागला आहे.

यानंतर त्याला विचारलं की, तूला तुझ्या लाईफ पार्टनरमध्ये कोणत्या क्वालिटी हव्या आहेत. यावर उत्तर देताना राघव सांगतो की, मी आयुष्यात काही लिहून ठेवत नाही.

कारण आपल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. आणि त्या कधीच पूर्ण होणार देखील नाहीत. कारण आपण कोणती गोष्ट खरेदी करत नाहीत.

तुम्हाला त्यावेळी एक्सप्लोर करावे लागते. समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. जर समोरच्या व्यक्तीच्या काही गोष्टी मला नक्कीच इम्प्रेस करु शकतात?

हे नातं एकमेकांसाठी नक्कीच चॅलेंजित असणे गरजेचे आहे. कारण आधीपासूनच तुम्ही जर अपेक्षा करुन ठेवलात तर ते नातं नक्कीच बोरिंग होईल यात काही शंका नाही.

जर समोरची व्यक्ती वाद करत असेल तर मला नक्कीच विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीवर मला बदल करणे अपेक्षित आहे. तीच गोष्ट मला आकर्षित करतात.

गेल्या काही काळापासून राघव आणि शहनाज यांचं नाव चर्चेत आहे. शहनाज राघवला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story