'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला आहे.
पाकिस्तानने जम्मूतील सीमावर्ती भागांवर हल्ला चढवला आहे.
भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना काही काळ सोशल मीडियापासून दूर होता.
'इंडियाज गॉट लेटेंट';च्या वादानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे.
समय रैनाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
त्याने लिहिले, 'जम्मूमधील लोकांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. चला शांत झोपूया आणि भारतीय लष्करावर विश्वास ठेवूया.'
त्याने लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आणि भारतीय सैन्य आपली सुरक्षितता पाहत असल्याचा विश्वास व्यक्त केला.