गणेश बाप्पाला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत तर तुलसी मातेचे स्थान देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये अधिक मानले जाते.
पद्मपुराणासह अनेक ग्रंथांमध्ये गणेश पूजेत तुळसीचा वापर करू नये असे स्पष्ट नमूद केले आहे.
एका पुराणकथेनुसार गणेशजींनी तुळसीच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला. रागावलेल्या तुळसीने गणेशाला शाप दिला त्यामुळे तुळसी गणेश पूजेत निषिद्ध झाली.
तुळसीमुळे गणेश पूजेची संपूर्ण फलप्राप्ती होत नाही असे मानले जाते. म्हणूनच तुळशीऐवजी दूर्वा अर्पण केली जाते.
पण फक्त भाद्रपद चतुर्थीला तुळशी दर अर्पण केले जाते. या दिवशी बाप्पा तिचा स्वीकार करतात. अन्यवेळी नाही.
दूर्वा वाहिल्याने मन:शांती मिळते व गणेशाची कृपा द्रुतगतीने प्राप्त होते असे मानले जाते.
तुलसी प्रामुख्याने विष्णू व लक्ष्मी पूजेत वापरली जाते. गणेश पूजेत तिचा समावेश न करण्यामागे धार्मिक परंपरा व संतुलन राखण्याचा हेतू आहे.
गणेश बाप्पाला दूर्वा आणि मोदक प्रिय आहेत, म्हणून भक्तांनी गणेश पूजेत याच गोष्टींचा विशेष समावेश करावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)