किती तास उपाशी राहिल्यानंतर शरीरातील चरबी वितळण्यास सुरुवात होते?

Published by: Zee Team | Apr 04, 2025

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लन करण्यात येतात. त्याचा दुष्परिणामही अनेकांनी भोगला आहे.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

कमी कॅलरीयुक्त आहारामुळे तुम्हाला अनेकदा थकवा, भूक आणि चिडचिड होतं. कमी कार्बयुक्त आहारामुळे भूक आणि बद्धकोष्ठताची समस्या होते.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

लोक वजन कमी करण्यासाठी कमी जेवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

वजन कमी करण्यासाठी सध्या इंटरमिटेंट फास्टिंग ट्रेंडिंगमध्ये आहे. यात 16 काहीही खायचं नसतं आणि फक्त 8 तास तुम्ही खाऊ शकता.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

उपाशी राहणे म्हणजे खाणे पिणे सोजून देणे असं होत नाही. अधूनमधून उपवास केल्यानेही चरबी वितळली जाते.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

आता अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, 16 तासांच्या उपासमारीचा काळ हा कमी करता येतो का?

Published by: Zee Team | Apr 04, 2025

हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्स म्हणते की नियतकालिक उपवास केल्याने चरबी वितळण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्हाला कमी कार्बौहायड्रेट किंवा केटो आहार घ्यावा लागेल.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

या आहारात तुम्ही 12 तास उपाशी राहिल्यानंतर तुमचं शरीर केटोसिसमध्ये जाते. म्हणजेच शरीरात केटोन्स तयार होतात जे शरीरातील चरबी वितळवून ऊर्जा मिळू लागते.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, 12 ते 14 तास उपवास केल्याने शरीरातील चरबीचे ऊर्जैत रूपांतर होऊ शकतं. ज्यामुळे रक्तप्रवाहात केटोन्स सोडलं जातं आणि वजन कमी होतं.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

काही तज्ज्ञ महिलांना 14 तास उपवास करण्याची शिफारस करतात. मग हळूहळू ते 16 तासांपर्यंत वाढवतात. तर पुरुष 16 तासांसाठी थेट उपवास करतात. त्यामुळे चरबी वितळण्यास मदत मिळते.

Published by: Zee Team | Apr 04, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Apr 04, 2025

VIEW ALL

Read Next Story