महिलांना मासिक पाळीच्या काळात वेदना, त्रास आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो.
हे काही पहार्थ खाणे टाळल्यास या वेदनांपासून थोडा आराम मिळू शकतो.
मासिक पाळीच्या काळात जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन वाढते आणि वेदना जास्त जाणवतात.
तळलेले आणि तेलकट पदार्थ पचनास अडचणी निर्माण करतात आणि सूज वाढवतात. त्यामुळे या काळात अशा पदार्थांपासून लांब राहणं फायदेशीर ठरतं.
ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी यामध्ये असलेल्या विशिष्ट घटकांमुळे पोट फुगण्याची शक्यता वाढतात. त्यामुळे मासिक पाळीमध्ये या भाज्या टाळाव्यात.
चिंच, लोणचं यांसारखे आंबट पदार्थ पचनावर परिणाम करू शकतात आणि जळजळ वाढवू शकतात. त्यामुळे पाळीच्या काळात हे पदार्थ खाणं टाळावं.
दुध, चीज, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ अती प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस आणि वेदना वाढू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.