Chankaya Niti

Chankaya Niti : निरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र चाणक्य यांच्या शिवकणीनुसार उत्तम आरोग्यसाठी आठवड्यातून किमान एकदातरी शरीराला मालिश करावी. ज्यानंतर आंघोळ करावी. असं केल्यास शरीराला मोठा फायदा होतो.

पाणी

जेवणादरम्यान पाणी न पिणं किंवा कमी पिणं ही सवय अतिशय फायद्याची. शिवाय जेवणानंतर निवांत बसून पाणी पिण्याचे अनेक फायदे.

पाणी पिणं शरीरासाठी फायद्याचं

आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार अन्न ग्रहण केल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरानं पाणी पिणं शरीरासाठी फायद्याचं.

मांसाहार

मांसाहार तुपाच्या तुलनेच कमीच फायद्याचा. कारण, जिथं तूप मांसाहारापेक्षा दहापट अधिक फायद्याचं तिथंच ते पचण्यासही सोपं. तुलनेनं मांसाहारामुळं पचनसंस्थेवही ताण येतो. त्यामुळं पचनक्षमता ओळखूनच अन्नग्रहण करावं.

मांसाहार

चाणक्य यांच्या सांगण्यानुसार शरीराला बळकटी देण्यासाठी दुधाचं सेवन होतं. पण मांस दुधापेक्षा दहापट अधिक फायद्याचं आहे.

डोळे

शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये तुमचे डोळे प्रमुख अवयव ठरतो, कारण अन्न सर्वप्रथम डोळ्यांनी ग्रहण केलं जातं.

चाणक्य म्हणतात...

चाणक्य म्हणतात, चक्षु इंद्रिय सब अंश में, शिर प्रधान भी जान॥. म्हणजेच अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया हीच मुळात डोळ्यांपासून सुरु होते.

गुळवेल

गुळवेलीचं सेवनही आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं असं चाणक्य सांगतात. यामुळं शरीराला विविध प्रकारच्या संसर्गांपासून लढण्याची ताकद मिळते.

तूप, गुळवेल

गायीचं तूप, गुळवेलीचं सेवन शरीराला कायमच फायद्याचं ठरतं. तुपाच्या सेवनामुळं हाडांना बळकटी येते.

VIEW ALL

Read Next Story