तुम्ही पाणी कमी पिता का ? मग आजपासूनच जास्त पाणी प्यायला करा सुरवात.

पाण्याला जीवन मानले जाते,शरीरासाठी पाणी फार महत्त्वाचे असते. पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे.

तुम्हीपण पाणी कमी पिणाऱ्यांपैकी आहात का? तर आजच सवय बदला.पाण्याचे सेवन कमी केल्याने बरेच तोटे होऊ शकतात. जाणून घ्या काय होते पाणी कमी प्यायल्यामुळे.

पाणी कमी प्यायल्याने शरीराचे निर्जलीकरण होते. शरीरातले पाणी कमी होणे हे फार वाईट लक्षण आहे.

पाणी कमी प्यायल्याने मूतखडा होतो , ही समस्या फारच सामान्य होऊन गेली आहे. मूतखडा होणे ही मोठी समस्या आहे उपायांनी बरे नाही झालात तर शस्त्रक्रिया करावी लागते.

कब्ज होण्याचे कारणसूद्धा बहूतांशः वेळा पाणी कमी पिणे आहे. पाणी पोट आतून साफ करत.

पाणी कमी प्यायल्याने त्त्वचेचे विकार होतात. पाणी त्त्वचा तरोताजी ठेवण्यात मदत करते. (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story