इवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा

Published by: Zee Team | Jul 16, 2024

प्राचीन काळापासूनच तुळस ही एक पवित्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील अनेक आहेत.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंतच्या अनेक आजारांवर तुळस रामबाण उपाय आहे. पावसाळ्यात तुळशीचे काढ्याचे सेवन करणे अमृतासमानच आहे.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीची पाने पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून मंद आचेवर पाणी उकळून त्याचे सेवन केल्यास शरीराला स्वच्छ करण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

मुबलक प्रमाणात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि इतर फायदेशीर पोषक तत्वांमुळे तुळशीचे पाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय ठरते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

तुळशीला अॅडप्टोडजेन मानले जाते कारण तुळस शरीराला ताणतणावाशी जुळवून आणि संतुलन राखण्यास घेण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

त्याचप्रकारे ज्यांची जीवनशैली तणावग्रस्त आहे त्यांनी दिवसातून एकदा तरी तुळशीचे पाणी प्यायलास फायदा होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 16, 2024

VIEW ALL

Read Next Story