चहानंतर लगेचच पाणी पिऊ नये असं का म्हणतात? वाचा खरं कारण

सकाळी उठल्यावर अनेकांना चहा पिण्याची सवय असते

चहा प्यायल्याशिवाय काहींचा दिनक्रमच सुरू होत नाही

चहा प्यायल्यानंतर काहींना लगेचच पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते

चहा घेतल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या दातांसाठी हानिकारक ठरु शकते. गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो.चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होते. व दात पिवळे पडण्यास सुरुवात होते.

चहानंतर पाणी पिणे पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते. अल्सरचा धोका वाढतो. चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये अॅसिडीटीचा धोका वाढतो. या त्रासाचे रुपांतर पुढे अल्सरमध्ये होते

चहावर पाणी प्यायल्याने पोटात दुखू शकते. तसंच, पोटात गॅसदेखील निर्माण होऊ शकतात

चहानंतर लगेचच थंडगार पाणी प्यायल्याने नाकातून रक्त येऊ शकते. कारण गरम आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलामुळं असं घडू शकते.

चहानंतर पाणी प्यायल्याने जुलाब होण्याची शक्यता आहे

जर तुम्हा चहानंतर लगेचच पाणी पिण्याची सवय टाळली नाही तर तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story