किडनी आपल्या शरीरासाठी 24 तास काम करत असते. तिच्याकडे शरीराचे आरोग्य राखण्याची जबाबदारी असते.
किडनी शरीरातील टॉक्सिंस आणि लिक्विड काढण्यासाठी काम करते. ती शरीरातील निरुपयोगी पदार्थ शोषून बाहेर काढते.
किडनी रक्तदाब नियंत्रित करण्यास, शरीरातील पाणी पातळी राखण्यास मदत करते.
किडनीसाठी पाण खूप महत्वाचे आहे. पाण्याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
साधारणपणे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्यास सांगितले जाते. पण किडनीचे आरोग्य राखण्यासाठी किती पाणी प्यावे? हा प्रश्न पडतो.
पाण्याचे सेवन हे तुमच्या वजन, आकार, हवामान, वातावरण, आहार, वैद्यकीय स्थिती, औषधे इत्यादी घटकांवर अवलंबून असते.
पुरुषांनी दररोज साधारण 15.5 ग्लास म्हणजे 3.7 लीटर पाणी प्यावे आणि महिलांनी साधारण 11.5 ग्लास म्हणजेच 2.7 लीटर पाणी प्यावे. मेयो क्लिनिकने याबद्दल माहिती दिली.
एवढंच पाणी प्याव असं नाही. तुम्ही चहा, कॉफी, फळे, ज्यूस यातूनही पित असलेल्या पाण्याचे प्रमाण पुरेसे असले पाहिजे.
सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यावे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)