Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात

Published by: Zee Team | Aug 08, 2023

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते काश्मिर या 4000 किलोमीटरचा टप्पा राहुल गांधी यांनी पायी गाठला होता.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

आता दुसरा टप्पा गुजरातपासून सुरु होणार असून मेघालायपर्यंत राहुल गांधी पायी प्रवास करणार आहेत.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा 7 सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाला. यादरम्यान 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांमधून ही यात्रा काढण्यात आली.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

भारत जोडो यात्रा तब्बल 130 दिवस चालली. 30 जानेवारी 2023 मध्ये काश्मिरमधल्या श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप झाला.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

'भारत जोडो यात्रा 2.0'चा मार्ग निश्चित झाला असला तरी ही यात्रा कधीपासून सुरु होणार याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

गुजरात विधानसभेचे अध्यक्ष अमित चावडा यांनी राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुजरातमधून करावी अशी विनंती केली होती,

Published by: Zee Team | Aug 08, 2023

दरम्यान, मोदी आडनाव प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर आज राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला परत करण्यात आला.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

याबाबत विचारलं असता संपूर्ण भारतच माझं घर आहे अशी प्रतिक्रया राहुल गांधी यांनी दिली.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

VIEW ALL

Read Next Story