अलार्म नसताना लोक कसे उठायचे? जाणून घ्या जुन्या काळातील रंजक पद्धती

Tejashree Gaikwad
Apr 05,2026


लोक ठराविक वेळेला झोपायचे आणि उठायचे. यामुळे शरीराची स्वतःची एक “जैविक घड्याळ” तयार व्हायची.


दररोज त्याच वेळेला उठण्याची सवय लागल्याने अलार्मची गरजच भासत नसे.


सकाळचा सूर्यप्रकाश ही सर्वात नैसर्गिक अलार्म प्रणाली होती.घरांची रचना अशी असायची की सूर्यकिरण आत येऊन लोकांना जाग करायचे.


ग्रामीण भागात कोंबडा हा नैसर्गिक अलार्म मानला जायचा. पहाटे कोंबडा आरवल्यावर लोकांना जाग यायची.


गावांमध्ये मंदिरातील घंटानाद किंवा मशिदीतील अजान लोकांना उठवायची. हे आवाज नियमित वेळेला होत असल्याने लोकांची दिनचर्या ठरलेली असायची.


काही देशांमध्ये “Knocker-Up” नावाचे लोक असायचे. ते लोकांच्या खिडक्या किंवा दरवाजांवर टकटक करून उठवायचे.


काही ठिकाणी पाण्याचे घड्याळ (water clock) किंवा वाळूचे घड्याळ वापरले जायचे. ठराविक वेळेनंतर ते रिकामे झाले की लोकांना वेळ कळायची. ही पद्धत थोडी अचूक पण मर्यादित होती.

VIEW ALL

Read Next Story