गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून भारतीय टपाल खात्यातील योजनांना अनेकजण पसंती देतात. त्यातलीच एक योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना.
दर दिवशी 50 रुपयांची बचत करून या योजनेतून एक चांगला परतावा मिळतो असा दावा पोस्टाकडून करण्यात येतो.
या योजनेत किमान 10000 आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. इथं प्रिमीयमची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाई किंवा वार्षिक अशा प्रकारांमध्ये करता येते.
दर दिवशी 50 रुपयांच्या बचतीचा मंत्र दिल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत 60 व्या वर्षी 34.40 लाख रुपये इतकी रक्कम मिळते.
वयाच्या 19 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास दर दिवसाच्या हिशोबानं महिन्याला 1500 आणि साठीपर्यंत साधारण 35 लाख रुपये इशी रक्कम खात्यावर जमा होते.
किमान रकमेतून चांगली बचत करण्याची सवय या योजनेमुळं लागते. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. योजनेत गुंतवणुकीआधी नियम व अटी वाचून घ्या. )