भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असून, इथं प्रत्येक राज्याचं स्वत:ची अशी एक सांस्कृतिक ओळख आहे.
ठराविक किमीच्या अंतरानंतर भारतात भाषा, जीवनशैली, खाद्यसंस्कृती, परंपरासुद्धा बदलतात.
अशा या विविधतेत एकता असणाऱ्या या देशामध्ये विविध प्रांत असून, त्यांचं ऐतिहासिक महत्त्वंसुद्धा तितकंच लक्षवेधी आहे.
अशा या भारतात एक राज्य असं आहे, जिथं असणाऱ्या शहराचं नाव सरळ लिहा किंवा उलट, त्याचा उच्चार मात्र बदलत नाही.
भारतातील या शहराचं नाव आहे, कटक. हे शहर ओडिशामध्ये आहे.
हे नाव उलट लिहा किंवा सरळ, त्याचा उच्चार बदलतच नाही. आहे की नाही गंमत.
भारतातील मिलेनियम सिटी किंवा सिल्वर सिटी म्हणूनही या शहराची एक वेगळी ओळख असून हे शहर त्याच्या सांस्कृतिक महत्त्वासाठीसुद्धा ओळखलं जातं.