भारतीय रेल्वे हे आशियातील दुसरं आणि जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.
भारतीय रेल्वे देशातील जवळपास प्रत्येक शहराला जोडते.
परंतू तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही एक असं राज्य आहे जिथे ट्रेन पोहोचलेली नाही.
भारतातील सिक्कीम हे एक असं राज्य आहे जिथे अद्याप ट्रेन पोहोचलेली नाही.
सिक्कीममध्ये एकही रेल्वे स्टेशन नसल्याचं कारण तेथील भौगोलिक परिस्थिती, डोंगर आहेत. ज्यामुळे येथे रेल्वे मार्ग तयार करणं अवघड आहे.
सिक्कीम 1975 मध्ये भारताचा भाग बनला होता. तेव्हापासून आतापर्यंत येथे कोणतंही रेल्वे नेटवर्क उभारण्यात आलेलं नाही.
सिक्कीम पासून सर्वात जवळचं रेल्वे स्थानक हे सिलिगुडी, न्यू जलपाई गुडी आहे.