मोदी सरकारच्या 'या' 9 योजना

तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

मेक इन इंडिया (Make In India)

मेक इन इंडिया मिशनचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत.

स्टार्टअप इंडिया (Startup India)

विविध प्रोत्साहनं, निधीद्वारे नियम सुलभ करून स्टार्ट अप्सला मदत करणं, हे या योजनेचा उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारकडून लोन प्रक्रिया सुलभ केली आहे.

डिजिटल इंडिया (Digital India)

प्रशासन आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल इंडिया सुरू केली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ई-गव्हर्नन्स सुलभ करून भारताला अधिक डिजिटली सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तुम्हीही तुमचं यात योगदान देत असालच.

स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission)

स्मार्ट सिटी मिशन शहरी नियोजन, परवडणारी घरे, मजबूत वाहतूक नेटवर्क आणि स्मार्ट गव्हर्नन्स यासारख्या गोष्टींवर भर येतो. तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता

वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)

हाय-स्पीड ट्रेनने देशातील रेल्वे प्रवासात क्रांती करण्याच्या उद्देशाने वंदे भारत एक्सप्रेसची योजना आखण्यात आली होती. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून मध्यम आणि लघु उद्योगांना कोणत्याही तारण न देता कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. लोकांना स्वावलंबी होण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी ही योजना आणख्यात आली होती.

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)

लाखो लोक औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकिंग सेवा, क्रेडिट, विमा आणि पेन्शनसाठी लोकांना बँकिंगच्या मदतीने सेवा देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

सर्व कुटुंबांना 2022 पर्यंत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. खाजगी विकासकांच्या भागीदारीत परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन करणं उद्देश ठेवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story