भारतात असंख्य लोक दररोज रेल्वेतून प्रवास करतात.
भारतीय रेल्वे नेटवर्क काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत पसरलंय.
भारतात दररोज अंदाजे 13 हजार गाड्या धावतात. ज्यामध्ये दररोज 2 कोटी प्रवास करतात.
स्वस्त आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून दिल्यामुळे भारतातील बहुतेक कुटुंब प्रवासासाठी ट्रेनची निवड करतात.
तुमच्या घरात लहान मूल असेल तर किती वर्षापर्यंत त्याला रेल्वे प्रवास मोफत आहे जाणून घ्या.
तुमचं मूल हे 1 ते 4 वर्षांच्या दरम्यान असेल तर रेल्वे तिकिटची गरज नाही.
5 वर्षाच्या वरती मुलांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकिट खरेदी करणे बंधनकारक आहे.