रशियामध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या 8.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतरही भूगर्भशास्त्रज्ञ सतर्क असून इतर ठिकाणी जाणवणाऱ्या कंपनांचं निरीक्षण कर आहेत.
रशियामध्ये आलेला हा भूकंप किनारपट्टी क्षेत्रात आलेल्या सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक होता.
या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की उत्तरी पॅसिफीक महासागर क्षेत्रात यामुळं त्सुनामीसम परिस्थिती उदभवली.
भारतातील किनारपट्टी भागांक़डेसुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही, कारण या शहरांवरही कायम त्सुनामीचं सावट राहिलं आहे.
भारतात त्सुनामी आल्यास प्रामुख्यानं किनाऱ्यानजीक असणाऱ्या आणि भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये येणाऱ्या भागांना विनाशाचा सर्वात मोठा धोका आहे.
चेन्नई, कोच्ची, विशाखापट्टणम, पुद्दुचेरी यांसारख्या शहरांचं त्सुनामी आल्यास मोठं नुकसान होऊ शकतं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
कोलकाता, मुंबई, काकीनाजा, पुरी, मछलीपट्टनम, रामेश्वरम, तुतीकोरिन आणि चावरा या शहरांनासुद्धा त्सुनामीचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.