भारतातील कोणते शहर 3 राज्यांची राजधानी आहे?
भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. एकूण 792 जिल्हे आहेत, त्यापैकी 752 जिल्हे राज्यांमध्ये आहेत. 45 जिल्हे केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.
देशभरात 7000 हून अधिक शहरे आहेत, त्यापैकी 300 शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक लोक राहतात. अनेक शहरं स्मार्ट शहरं म्हणून ओळखली जातात.
पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणते शहर तीन राज्यांची राजधानी आहे.
जर तुम्हाला भारतातील कोणते शहर तीन राज्यांची राजधानी आहे हे माहित नसेल तर ते येथे जाणून घेऊयात. स्वत:ला जीकेमध्ये तज्ज्ञ म्हणवणारे देखील या शहराचे नाव सांगू शकलेले नाहीत.
हे शहर भारतातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते 1950 च्या दशकात बांधले गेले.
याला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचं स्वप्ननगरी असंही म्हणतात. या शहराची रचना फ्रेंच वास्तूविशारद ले कॉर्बुसियर यांनी केली होती.
आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत, त्याच नाव आहे चंदीगढ.
चंदीगढ हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. ते एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची स्वत:ची राजधानी आहे.
1 नोव्हेंबर 1966 मध्ये चंदीगढला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. इथे तुम्हाला रॉक गार्डन, झाकीर रोज गार्डन आणि शांतीकुंज सारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात.