सर्वांनाच वाटतं की जीवन चांगलं जगावं पण खर्च सुद्धा कमी व्हावेत.
काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात महागड्या शहरांची लिस्ट जाहीर करण्यात आली. यात मुंबईचा क्रमांक पहिला होता.
मुंबई जर देशातील सर्वात महाग शहर असेल तर सर्वात स्वस्त शहर कोणतं असा प्रश्न पडतो.
देशातील सर्वात स्वस्त शहर हे 'तिरुवनंतपुरम' आहे.
'तिरुवनंतपुरम' ही केरळ शहराची राजधानी आहे. इथे राहण्याचा खर्च हा खूप कमी आहे.
घरभाडं, जेवण, वाहतूक आणि दैनंदिन गरजा देशातील अनेक मोठ्या शहरांपेक्षा 30 -40 % स्वस्त आहेत.
इथे 1 BHK फ्लॅटची किंमत 7 ते 10 हजार आहे. जे भारतातील मोठ्या शहरांच्या तुलनेत खूप कमी आहे.
तिरुवनंतपुरममध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी जसे भाज्या, फळ, घरगुती सामान इत्यादी सर्व कमी भावात मिळतात.