मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधला. यामुळेच ताजमहालला प्रेमाचे प्रतीक देखील म्हटले जाते.
सूर्यप्रकाशापासून चंद्रप्रकाशापर्यंत, प्रत्येक प्रकाशात ही पांढरी संगमरवरी इमारत अत्यंत सुंदर दिसते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान ताजमहाल काळ्या कपड्याने झाकण्यात आला होता.
यादरम्यान पाकिस्तानला ताजमहालवर बॉम्बस्फोट करून तो पाडायचा होता, असे मानले जाते.
सुरक्षेचा विचार करून भारत सरकारने ताजमहालचे घुमट आणि त्यातील चार मिनार काळ्या कापडाने झाकण्याचा निर्णय घेतला होता.
वृत्तानुसार, ताजची पुढची फरशी झाडाची पाने आणि गवताने झाकलेली होती.