सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन असतो. मात्र बरेच लोक मोबाईल फोन वापरताना चुक करतात, ज्यामुळे फोन खराब होतो.
काहीजण रात्री फोन चार्जला लावून विसरतात, ज्यामुळे फोनची बॅटरी प्रमाणापेक्षा जास्त चार्ज होते आणि त्याचा बॅटरीवर परिणाम होतो.
नेहमी फोनला ओरिजनल चार्जरनेच चार्ज करायला हवा. अन्यथा ते फोन आणि बॅटरी दोन्हीसाठी हानिकारक असतं.
सलग खूप तास फोन वापरल्याने तो गरम होतो आणि त्याचा फोनवर वाईट परिणाम होऊ शकतो.
काहीजण फोनची बॅटरी 1 टक्क्यावर येत नाही तोवर फोन चार्जिंगसाठी लावत नाहीत. असं करणं चुकीचं आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)