27 ऑगस्ट रोजी घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. अनेकाकांच्या घरी डिड, पाच, सात, दहा आणि एकवीस दिवसांसाठी बाप्पा बसता. त्यानंतर मात्र त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं.
पण तुम्हाला माहितीये का मूर्ती विसर्जनाची प्रथा कधीपासून पडली आणि मुर्त्यांचं विसर्जन हे पाण्यातच का केलं जातं?
संबंधित विषयावर इंटरनेटवर विविध स्रोतांमध्ये माहिती लिहिलेली आहे.
मूर्ती विसर्जनाची पद्धत ही हिंदू धर्मात फार पूर्वी पासून असली तरी गणपतीच्या मुर्त्यांची प्रथा ही महाभारत ग्रंथांच्या रचनेनंतर सुरु झाल्याची माहिती आहे.
मूर्ती विसर्जनाचा अर्थ म्हणजे पूजा करण्यात आलेल्या मूर्तीला पाण्यात विलीन करणे. हा या मूर्तीचा सन्मान मानला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्याला पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं. त्यामुळे अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)