भारतात हमखास लोक चमच्याने जेवणाऐवजी हाताने जेवण जेवतात . पण असं का? जाणून घ्या
हाताची पाच बोटे ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांचे प्रतीक मानली जातात.
आयुर्वेदानुसार, हाताने जेवल्यावर पाचक रस स्रवू लागतात, जे पचनासाठी फायदेशीर आहेत.
हाताने जेवलं की आपण किती खातो यावर अधिक नियंत्रण ठेवू शकतो.
हाताचा अन्नाला स्पर्श म्हणजे मेंदूला ‘जेवण येतंय’ असा संकेत आणि पचनक्रिया सुरू होते.
हाताने खाल्लं तर अन्नाचा पोत आणि तापमान अधिक चांगल्या प्रकारे जाणवतं.
जेवणापूर्वी आणि नंतर हात धुणे ही भारतात नेहमीच एक सवय राहिली आहे, ज्यामुळे स्वच्छता राखली जाते.