जेव्हा तुम्ही स्वंयपाक बनवता तेव्हा सर्वात मोठे काम असते ते म्हणजे हिरव्या मिरच्या कापणे.
कारण हिरवी मिरची कापल्यानंतर कधी कधी हात जळजळतात.
अशा वेळी, जर चुकून ते हात आपल्या चेहऱ्याला किंवा डोळ्याला लागले तर संपूर्ण चेहऱ्यावर जळजळ होते.
मिरच्या कापण्यापूर्वी हातावर तूप लावा.
तूपामुळे तुमच्या हातांवर एक थर तयार होतो जेणेकरून मिरचीतील कॅप्सेसिन त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाही आणि जळजळ टाळता येईल.
मिरच्या कापल्यानंतर जर तुमच्या हाताना जळजळ वाटत असेल तर घाबरू नका.
जळजळ कमी करण्यासाठी, थंड पाण्यात मीठ घाला आणि त्यात हात काही वेळासाठी वेळ हात बुडवून ठेवा.
जर तुम्हाला मिरच्या कापण्यात खूप अडचण येत असेल तर तुम्ही चाकूऐवजी कात्रीच्या मदतीने सुद्धा मिरच्या कापू शकता.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)