कांदा कापल्यानंतर बराच वेळ तो उघड्यावर ठेवला तर त्यातून उग्र वास येण्यास सुरुवात होते. हातांनाही कांद्याचा हा उग्र वास टिकून राहतो.
कांद्याचा हा वास त्यात असणाऱ्या सल्फरयुक्त घटकांमुळे येतो आणि तो टिकून राहतो.
हाताला कांद्याचा वास येते असल्यास मीठानं हात धुवावेत. उग्र वास दूर होतो.
कांदा कापल्यानंतर हात ओला करून त्यावर मीठ चोळून हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
कांद्याचा वास घालवण्यासाठी हात दुथपेस्ट किंवा माऊथवॉशनं धुवावेत.
लिंबाच्या रसानं हात धुतल्यासही कांद्याचा उग्र वास नाहीसा होतो.
कॉफी बिन्स हातावर चोळून त्याचा स्क्रब म्हणून वापर केल्यास कांद्याचा उग्र वास नाहीसा होतो.