आपल्यापैकी प्रत्येकाचं एखाद्या ना एखाद्या बँकेत तरी खातं असतं. याच खात्याच्या माध्यमातून आपण आर्थिक व्यवहार करत असतो.
मात्र बँकांमध्ये काही आर्थिक व्यवहारांना बंदी असते. असे व्यवहार तुमच्या खात्यावर कळत, नकळतपणे झाले तर तुमचं खातं बँक गोठवू शकते.
तुमच्या खात्याशी संलग्न व्यवहार थांबवण्याचा तसेच तुमचं खातं गोठवण्याचा अधिकार बँकांकडे असतो.
तुमच्या खात्यावरुन फसवणूक होत असल्याची शंका बँकेला आली तर त्या खात्यावरुन होणारे व्यवहार थांबवण्याचे अधिकार बँकेला असतात.
तुमच्या बँक खात्यावरुन काळापैसा किंवा बेनामी पैसा वळवण्यात आला आहे किंवा तसे व्यवहार झाल्याची शंका आल्यास बँक खातं गोठवू शकते.
किमान बॅलेन्स अथवा नियमितपणे खातं हातळलं जात नसेल तर बँक ते खातं गोठवू शकते.
कोर्टाने एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुमच्या खात्यावरील व्यवहार रोखून धरण्यास सांगितले तर तुमचं खातं बँकेकडून कोर्टाच्या आधेशानुसार गोठवलं जाऊ शकतं.
असामान्यपणे तुमच्या खात्यावरुन व्यवहार होत आहेत, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे असं दिसून आलं तर बँक तुमचं खातं काही काळासाठी किंवा पडताळणीपुरतं गोठवू शकते.
बँक खातं गोठवल्यास बँकेशीस संपर्क साधून त्यामागील कारण जाणून घेऊन आवश्यक ती पूर्तता केल्यास बँकेकडून खातं पुन्हा सुरु केलं जातं.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.)