बचत करणे ही एक चांगली सवय मानली जाते. त्यातही पैशाने पैसा वाढवण्याचं कौशल्य चांगलं लक्षणं मानलं जातं.
प्रत्येकाला बचत करण्याची सवय नसते तसेच अनेकांना ती सवय लावताही येत नाही.
खर्चिक स्वभाव असल्याने अनेकदा असे लोक आपल्या पगारातील बराचसा पैसा कुठेही गुंतवणूक न करता खर्च करुन टाकतात. अनेकदा हा वायफळ खर्च असतो.
यामुळेच महिन्याच्या शेवटी आर्थिक चणचण निर्माण होते. म्हणूनच पैसे जपून वापरण्याची गरज आहे.
महिन्याच्या शेवटी तुमचा खिसाही रिकामा राहत असेल तर तीन गोष्टी तुम्ही पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजेत.
या तीन गोष्टी केल्याने तुम्ही तुमच्या पगारात महिन्याचा खर्च सहज भागवू शकता आणि काही पैसे बचत म्हणून बाजूलाही काढू शकता.
तुम्ही तुमचा पगार महिनाभर पुरावा यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला वापरु शकता.
50 टक्के गरजा, 30 टक्के लाइफस्टाइल, 20 बचत असा हा फॉर्म्युला असावा.
पगार येताच महिन्याच्या खर्चाचं एक बजेट निश्चित करा आणि ते काटेकोरपणे पाळलं जाईल याची काळजी घ्या.
वायफळ खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग आणि बाहेर खाण्याच्या इच्छांना थोडी मुरड घालणं उत्तम निर्णय ठरु शकतो.
आपल्या पगारातील काही पैसे दुसऱ्या खात्यावर वळवा जे युपीआयशी संलग्न नसेल.
आपल्या पगारातून काही पैसे बाजूला काढून आपत्कालीन निधी साठवण्यास सुरुवात करा. असं केलं तर तुम्हाला कोणाकडून पैसे उधार घेण्याची वेळ येणार नाही. (प्रातिनिधिक फोटो)