'इतक्या' तासांनंतर चपाती होते शिळी!

Published by: Zee Team | Feb 07, 2024

आहारातील महत्त्वाचा घटक

चपातीविषयीच सांगावं, तर भारतातील अनेक कुटुंबांकडून आहारामध्ये चपातीचा समावेश केला जातो. मुळात चपाती ही कायमच ताजी बनवून खाणं अपेक्षित असतं.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

प्राधान्य

अनेकदा काही कुटुंबांमध्ये मात्र चपात्या एकाच वेळी जास्त प्रमाणात बनवून त्यानंतर त्या गरजेनुसार खाण्याला प्राधान्य दिलं जातं.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

अन्नपदार्थ

अन्नपदार्थ वाया जाऊ नये आणि तातडीनं ते खाताही यावेत हे त्यामागचे हेतू असतात. चपातीच्या बाबतीतही असंच घडतं.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

चपाती फ्रिजमध्ये ठेवली जाते

अनेकदा चपाती बनवल्यानंतर ती फ्रिजमध्ये ठेवली जाते, गरजेनुसार गरम करून खाल्ली जाते. पण, ती योग्य पद्धतीनं फ्रिजमध्ये ठेवली तरच व्यवस्थित टीकू शकते.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

आहारजत्ज्ञांच्या मते...

अनेकदा दीर्घकाळापासून बनवून ठेवलेली चपाती खाल्ल्यानं पोटदुखीही उदभवते. जाणकार आणि आहारजत्ज्ञांच्या मते सकाळी बनवलेली चपाती 12 ते 14 तासांमध्ये खाणं अपेक्षित असतं.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

कधी शिळी होते चपाती?

चपाती बनवून 14 तासांनंतर खाल्ल्यास बऱ्याचदा ती शिळी होऊन ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळं पोटाच्या विकाराचा धोका उदभवतो.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

VIEW ALL

Read Next Story