कळत नकळत जेवण्याच्या अनेक सवयी वजन वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत या वस्तूस्थिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अनेकदा पटापट खाण्याच्या नादात मेंदूपर्यंत पोट भरण्याचे संकेत अतिशय धीम्या गतीनं पोहोचतात. ज्यामुळं अवाजवी खाणं वाढतं.
टीव्ही आणि मोबाईल पाहत जेवताना अनेकदा आपण किती खातोय याचा अंदाजच येत नाही आणि जास्त खाणं खाल्लं जातं. तर काही प्रसंगी भूक नसतानाही खाल्लं जातं आणि वजन वाढतं.
अति प्रमाणात गोडाचे पदार्थ खाणं, शीतपेय पिणं यामुळं शरीरातील कॅलरी वाढतात आणि परिणामी वजनावर याचा परिणाम होतो.
रात्री उशिरा खाल्ल्यानं मेटाबॉलिझम अधिक वेळ घेतं आणि त्यामुळं शरीरात चरबी साठून राहते.
शीतपेय किंवा ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं नकळत वजन वाढतं.
वेळेवर न खाणं, अनियमित पदार्थांचं सेवन, असंतुलित आहार आणि सतत बाहेरचं खाणं अशा कारणांमुळं वजन वाढतं.