भारतासहित जगभरातील अनेक देशांमध्ये होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो.
पौर्णिमा तिथीला सगळीकडे होळीका दहन करण्यात येते.
होळीका दहनामागे धार्मिक कारणे तर आहेतच, पण त्यातून इतर आरोग्यदायी फायदे देखील मिळतात.
तुम्हाला माहित आहे का? होळीका दहानात शेणाच्या पेंड्या टाकल्या जातात?
होळीका जाळण्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे (उदा. लाकूड, शेण) वातावरणातील घातक जीवाणू नष्ट होतात.
या काळात ऋतु बदलत असते. त्यामुळे वातावरणातसुद्धा बदल होतात.
या बदलांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणूनच हवा शुद्ध करण्यासाठी होळीका दहनात शेणाच्या पेंड्या टाकतात.
होळीमध्ये शेणाच्या पेंड्या टाकण्याचे धार्मिक कारण म्हणजे गायीला हिंदू धर्मानुसार खूप पवित्र मानले जाते.
शेणाच्या पेंड्यातून निघणाऱ्या धुरामुळे नकारात्मकता आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे.
(Disclaimer: सदर माहिती दंतकथा आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)