पावसाळा सुरु झाल्यावर अनेकजण ग्रुपने जंगलात, गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जातात.
पावसाळ्यात ट्रेकींगला गेल्यावर निसर्ग सौंदर्य ट्रेकर्सना भुरळ पाडते.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना सोबत मीठ ठेवायला हवं. मात्र यामागचं कारण माहितीये का?
ट्रेकींगला जाताना सोबत मीठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
पावसाळ्यात डोंगराळ भागात, जंगलात विविध प्रकारचे किडे असतात.
बऱ्याचदा हे किडे त्वचेला चिटकतात आणि इजा पोहोचवतात. अशावेळी मीठ किड्यांच्या संपर्कात आलं तर ते लगेचच त्वचेपासून दूर होतं.
या कारणामुळे ट्रेकींगला जाताना सोबत मीठ ठेवायला विसरू नये असं जाणकार सांगतात. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.