सततचे हवामान बदल आणि त्यामुळं समुद्रातील वाऱ्यापासून अगदी समुद्रातील पाण्यावर होणाऱ्या परिणामाचा थेट परिणाम मत्स्यव्यवसायावर आणि मत्स्यप्रेमींवरही झाला आहे.
अरबी समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मागील आठ दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे.
वादळी वाऱ्यांमुळे आणि अजस्र लाटांचा सतत होणारा मारा पाहता मुंबई, कोकण आणि नजीकच्या किनारपट्टी भागांमध्ये मासेमारीच्या अनेक नौका बंदरातच आहेत.
दुसरीकडे हिवाळ्याचे दिवस नजीक असल्यानंसुद्धा मासळी समुद्राच्या तळाशी जाम्यास सुरुवात झाल्यानं मस्त्यव्यवसायावर याचा परिणाम झाला आहे.
बांगडा 150 वरून 300 रुपयांना विकला जात आहे. कोळंबी, सरंगा, मोडोसाचे दर 25 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.
सध्या मासळी बाजारात सुरमईचा दर 500 रुपयांवरून थेट 800 ते 1200 रुपये किलोवर गेला आहे. तर, पापलेट 700 वरून दीड हजारांपर्यंत पोहचलं आहे.
खवैय्यांच्या आवडीच्या माशांचे दर वधारले असून, त्यामुळं आता आवडीचं जेवण करायचं तरी कसं हा प्रश्नसुद्धा अनेकांपुढं उभा राहिला आहे.