बापरे! 30 तास पाणीपुरवठा बंद... नागपुरकरांनो तारीख, वेळ नोंदवून घ्या; पाणी जपून वापरा

पाणीपुरवठा बंद राहणार

नागपुरात शहरातील काही भागात उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

30 तास पाणी पुरवठा बंद

जवळपास 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही

पूर्व नागपूरातील भरतवाडा, कळमना भाग, नंदनवन, सक्करदरा, इंदोरा या भागातील अनेक जलकुंभावर 30 तास पाणी पुरवठा होणार नाही.

...म्हणून बंद राहणार पाणी

अमृत जल लाईनअंतर्गत पाईपलाईन जोडणी काम आणि मुख्य लाईनवरील गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

किती ते किती वाजेपर्यंत पाणी बंद राहणार?

20 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 21 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

इथे असणार जोडणीचं काम

जगनाडे चौक, नंदनवन मुख्य रस्ता, खरबी रस्ता भागाअंतर्गत जोडणी असणार आहे.

इथे होणार गळती दुरुस्तीचे काम

खैरिपुरा डिप्टी सिग्नल, कॅन्सर हॉस्पिटल कळमना भागात गळती दुरुस्तीचे काम असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story