डोंबिवली ही मध्य रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकांपैकी एक असून दररोज येथून हजारो प्रवासी प्रवास करतात.
पूर्वी डोंबिवली हे गाव होतं, मात्र यागावाचं शहरीकरण झालं आणि आता या शहराचा समावेश देशातील 100 स्मार्ट सिटीमध्ये झालेला आहे.
या परिसरात खूप पूर्वी डोंब लोकांची वस्ती होती, ज्यामुळे त्याचं नाव 'डोंबिवली' असं पडल्याचं म्हटलं जातं.
1153 सालातील शिलाहार राजा हरिपालदेवचा माहूल शिलालेख उपलब्ध आहे. यात दोन दानांचा उल्लेख केलेला आहे.
यातील पहिलं दान माहवल म्हणजे आताचं माहूल गाव तर दुसरं दान डोंबिल गावाशी निगडीत आहे.
तेव्हाचं डोंबिल गावं म्हणजे आजचे डोंबिवली शहर असे जाणकार सांगतात.