रायगडावर तोफांचा मारा करून झुल्फिखार खानाने तेथील सगळं वैभव नष्ट केलं होतं.
1818 मध्ये ब्रिटिश अधिकारी प्रॉथरने रायगड किल्ला ताब्यात घेतला होता.
त्यावेळी रायगड किल्ला हा वन खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथं कोणालाही प्रवेश नव्हता.
संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या कारणामुळे 65 वर्षे किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली होती.
या बंदीमुळे रायगड किल्ल्याच्या देखभालीवर देखील मोठा परिणाम झाला होता.
त्यानंतर किल्ल्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले होते.
रायगड किल्ल्याबाबतची संपूर्ण माहिती प्र. के घाणेकर यांनी त्यांच्या एका लेखात नमूद केली आहे.