हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी पितृदोषासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते.
त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करताना एक कणकेचा दिवा पितरांसाठी नक्की लावा.
अन्यथा घरात संकट येऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
दीप अमावस्येला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा घरातील दक्षिण दिशेला लावा.
ज्योतिषशास्त्रानुसार घरातील दक्षिण दिशा ही पितरांसाठी मानली गेली आहे.
हा खास दिवा गुळ आणि कणकेपासून तयार केला जातो.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावा. अन्यथा तुमच्यावर पितरांचा दोष कायम राहतो.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)