हिंदू धर्मात व्यक्तीच्या गोत्राला अधिक महत्त्व आहे.
हिंदू धर्मात लग्नाच्यावेळी मुलगा-मुलीचे गोत्र विचारले जाते.
जर दोघांचे एकच गोत्र असेल तर त्यांचं लग्न केलं जात नाही. कारण हिंदू धर्मात एकाच गोत्रात लग्न करण्यास परवानगी नाही.
एकच गोत्र असेल तर का केलं जात नाही लग्न? कारण काय?
पौराणिक मान्यतेनुसार, गोत्रांचा संबंध हा ऋषींशी असल्याचं म्हटलं जातं.
प्राचीन काळात, मुख्य असे चार गोत्र होते. अत्रि, जन्मदग्रि, अगस्त आणि विश्वामित्र.
एकाच गोत्राच्या अंतर्गत येणारे सगळे स्त्री आणि पुरुषांचे पूर्वज कुणी ऋषी असल्याचं सांगण्यात येतं.
यानुसार एकाच गोत्रात मुलं-मुली एकमेकांची भावंडं असतात. यामुळे हे लग्न होत नाही.
एकच पूर्वज असल्यामुळे समान गोत्रात लग्न करण्यास परवानगी दिली जात नाही.
ही माहिती फक्त वेगवेगळ्या धर्मग्रंथ आणि माध्यमांच्या आधारे दिली आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही.