लग्ना आधी वेगवेगळ्या प्रकारच्या विधी होत असतात. त्या विधीची सुरुवात साखरपुड्यानं होते.
त्यापैकी एक म्हणजे हळीचा कार्यक्रम. यात लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी नवरदेव आणि नवरी मुलीला हळद लावण्यात येते.
पण लग्नाच्या आधी हा हळदीचा कार्यक्रम का असतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
खरंतर हळद शूभ कार्यात वापरली जाते त्याचं कारणचं हे आहे की हळदीला पवित्र स्थान देण्यात आलं आहे.
हळद निगेटिव्ह एनर्जीपासून तुम्हाला लांब ठेवते अशी मान्यता आहे.
हळदीत करक्यूमिनसोबतच अनेत तत्व असल्याचे म्हटले जाते. जे आपल्या शरिराला शांत आणि रिलॅक्स करण्यास महत्त्वाचे ठरतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)