हिंदू संस्कृतीतील अनेक अशा परंपरा आहे. ज्यांना विज्ञानानं देखील योग्य म्हटलं आहे.
पायत पैंजण घालणं हे विवाहीत असल्याचं प्रतीक असतं. तर विज्ञानानुसार पैंजन घातल्यानं गर्भाशय मजबूत राहतो.
सकाळी पाणी अर्पण केल्यानं सूर्याची किरणं पाण्याच्या माध्यमातून डोळ्यांवर येतात. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
पाया पडण्यासाठी आपण वाकतो आणि त्यामुळे रक्ताभिसरणं चांगलं होतं. हाडं मजबूत राहतात.
नमस्कार करण्यासाठी हात जोडतो त्यामुळे बोटांवर प्रेशर येतो आणि त्यामुळे मेंदू आणि इम्यून सिस्टम सक्रिय होते.
मंदिरातील घंटा वाजवल्यानं तयार होणाऱ्या आवाजानं मेंदूला शांत करत एकाग्रता करण्यास मदत होते.
कपाळावर टिळा लावताना ऊर्जा केंद्रावर प्रेशर येतो त्यामुळे डोके दुखी सारख्या समस्यांपासून सुटका मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)