टीम इंडियाचा सलामी फलंदाज अभिषेक शर्माने रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
अभिषेक शर्माने केवळ 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.
अभिषेक शर्मा हा भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सामन्यात सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड युवराज सिंहच्या नावावर होता.
युवराज सिंह हा अभिषेक शर्माचा गुरु आणि मार्गदर्शक आहे. युवराज सिंहने अभिषेक शर्माला क्रिकेट ट्रेनिंगमध्येही त्याला बरीच मदत केली होती.
एवढंच नाही तर अभिषेक शर्माने सर्वात कमी चेंडूत 50 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा नावावर केला. अभिषेकने टी20 मध्ये फक्त 331 चेंडूत 50 षटकार पूर्ण केले.
भारत - पाक टी 20 सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा अभिषेक शर्मा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 23 बॉलमध्ये मोहम्मद हफीज याने अर्धशतक ठोकले होते.