टीम इंडियाचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. 29 ऑक्टोबर पासून उभा या सीरिजला सुरुवात होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यांच्या इतिहासात, टीम इंडियाच्या फक्त एकाच खेळाडूने शतक झळकावले आहे.
मात्र असं असलं तरी या क्रिकेटरला भारतीय संघात न खेळून जवळपास एक वर्ष झालंय.
मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
2023 मध्ये ऋतुराज गायकवाडने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 बॉलमध्ये नाबाद 123 धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाडच्या या शतकात 13 चौकार आणि 7 सिक्सचा समावेश होता.
टीम इंडियासाठी ऋतुराज गायकवाडने 6 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळले आहे.
दुसरीकडे तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताविरुद्ध टी 20 मध्ये शतकं झळकावली आहेत. यात शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल आणि जो इंगल्स यांचा समावेश आहे.