'...तर भारत वर्ल्डकप फायनलमध्ये हरेल', युवराज सिंग असे का म्हणाला?

Published by: Zee Team | Nov 19, 2023

वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाचा सामने पाहता, ते खराब कामगिरी करतील असे मला वाटत नाही. पण आपल्या चुकांमुळेच टीम इंडिया हरू शकते. पण मला वाटतं की भारतीय संघ यावेळी आत्मविश्वासाने भरलेला आहे.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

मात्र, ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही चांगला खेळ केला आणि अंतिम फेरी गाठली पण ऑस्ट्रेलियाने आमचा पराभव केला.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

यावेळी मला वाटते की भारताने या स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल अन्यथा त्यांना भारताविरुद्ध जिंकण्याची शक्यता नाही.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ असा संघ नाही ज्याला तुम्ही हलक्यात घेऊ शकता. दडपण कसे हाताळायचे हे ऑस्ट्रेलियाला माहीत आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वचषक जिंकला आहे.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

भारत स्वतःच्या चुकांमुळे फायनल गमावू शकतो. आपण पूर्वी असेच पाहिले आहे. पहिल्या तीन फलंदाजांची प्रगती खूप महत्त्वाची आहे, असेही युवराज म्हणाला.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

त्या तीन फलंदाजांनी धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाला संधी नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या तीन फलंदाजांवर नियंत्रण ठेवले तर भारतावर दबाव वाढेल.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

दुसरीकडे, रोहित शर्मा संघासाठी खेळतो आणि तो चांगला नेता आहे. त्याने गोलंदाजीत महत्त्वाचे बदल केले आहेत, असेही युवराज म्हणाला.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

VIEW ALL

Read Next Story