पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, राफेलचा करारामुळे पाकचा थरथराट!

Rafale Marine: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे आधीच पाकिस्तानची पाचावर धारण बसलीय.

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 28, 2025, 09:43 PM IST
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, राफेलचा करारामुळे पाकचा थरथराट!
राफेल

Rafale Marine: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलीय. दहशतवादी आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घड़वण्याची मागमी जोर धरू लागलीय. यातच आता भारत सरकारने एक मोठं पाऊल उचललंय. भारताने फ्रान्ससोबत 26 राफेल मरीन विमानांसाठीचा करार केलाय. यामुळे भारताच्या नौदलाची ताकद वाढणाराय. मात्र या करारामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीय.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे आधीच पाकिस्तानची पाचावर धारण बसलीय.. कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर भारत आणखी काही तरी मोठं पाऊल उचलणार या भीतीखाली पाकिस्तान आहे. त्यामुळे पाक लष्करातही हालचाली सुरू आहेत. मात्र आता भारताने उचललेल्या एका मोठ्या पावलानंतर पाकिस्तानचा थरथराट झालाय. कारण भारताने फ्रान्ससोबत 26 राफेल मरिन विमानांचा करार केलाय. या करारामुळे पाकिस्तानची अक्षरक्षा घाबरगुंडी उडालीय.. भारताने फ्रान्ससोबत 26 राफेल मरिन विमानांचा हा 63 हजार कोटींचा करार आहे.. या आधी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 36 राफेल विमानं आहेत.. आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही 26 राफेल मरिन विमानं सामील होणार असल्यानं भारतीय नौदलाचीही ताकद वाढणार आहे.

काय आहेत राफेल मरीनची वैशिष्ट्ये?

राफेलची रेंज - 3700 किमी असून त्याचा वेग - 2200 किमी प्रतितास इतका आहे. याची उड्डाण क्षमता 50 हजार फूट इतकी आहे. आण्विक सयंत्र हल्ला आणि जहाज विरोधी स्ट्राईक करणं शक्य आहे. यातून 9 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. मिड-एअर रिफिलिंग आणि प्रगत रडार तंत्रज्ञान असल्याने अतिशय सखल ठिकाणी उतरता येते. राफेल मरीन हे सध्याच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत असून त्यात 10 तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करता येतो. 

लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या जार ताकदीचा अंदाज घेतला तर भारत पाकिस्तानपेक्षा खूप बलाढ्य आहे. त्यात फ्रान्ससोबत झालेल्या 26 राफेल मरिनच्या या करारानंतर भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठी भर पडणार आहे. फ्रान्स सोबत झालेल्या या राफेल मरीनच्या करारानंतर पाकिस्तानची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालीय.