'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार, फक्त 'या' कारणांनी होतोय उशीर

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता अखेर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 20, 2024, 05:39 PM IST
'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार, फक्त 'या' कारणांनी होतोय उशीर title=

Bajrangi Bhaijaan Movie Sequel Script :  बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे 'बजरंगी भाईजान'. सलमान खान, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील कथानकाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता अखेर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

सलमान खानचा बहुचर्चित 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाची गाणी, डायलॉग, कथानकाने चाहत्यांनी मने जिंकली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त एका कारणासाठी हा चित्रपट बनवण्यात अडचणी येत असल्याचे बोललं जात आहे. आयुष शर्माच्या आगामी 'रुस्लान' या चित्रपटाच्या निमित्ताने एक प्रमोशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्माते केके राधामोहन यांनी 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले. 

सलमानच्या होकारानंतरच चित्रपटाच्या शूटींगला होणार सुरुवात

यावेळी ते म्हणाले, 'बजरंगी भाईजान 2' या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. आम्ही लवकरच ही कथा सलमान खानला सांगू. त्याने हे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर समंती दिल्यावर लगेचच चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे निर्माते केके राधामोहन म्हणाले. यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

दरम्यान ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सलमान खानच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्याचे बजरंगी हे पात्र सुपरहिट ठरले. या चित्रपटात शाहिदा नावाची एक मुकी पाकिस्तानी मुलगी आपल्या आईसमवेत दिल्ली-लाहोर रेल्वेने प्रवास करत असताना हरवते आणि भारतात अडकते. यानंतर ती बजरंगी नावाच्या एका मुलाला सापडते आणि तो तिला सुखरूपपणे पाकिस्तानात तिच्या पालकांकडे पोचवण्याची जबाबदारी घेतो, असे कथानक 'बजरंगी भाईजान'मध्ये दाखवण्यात आले आहे. 

दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

या चित्रपटात करीना कपूर, हर्षाली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने भारतात 320.34 कोटींची कमाई केली होती. तर या चित्रपटाने जगभरात 700 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.