3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?

Maharashtra Health: राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 2572 इतकी नोंद झाली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 9, 2024, 05:23 PM IST
3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते? title=

Malaria, Dengue, and Chikungunya Significantly : डासांमुळे होणाऱ्या आजारांमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये महाराष्ट्राची आकडेवारी धक्कादायक करणारी आहेत. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्या विभागाने माहिती दिली असून गेल्या वर्षी राज्यात 36,857 लोकांना डासांमुळे होणाऱ्या आजाराची लागण झाली होती. त्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्रात विक्रमी नोंद झाली होती. यंदाही डासांचा प्रादुर्भाव आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत मलेरियाने 2,038, डेंग्यूने 1,220 आणि चिकनगुनियाने 330 लोकांना बाधित केले. पावसाळ्यापूर्वीच अशी अनेक प्रकरणे आढळून आली. तर पावसाळ्यात बाधितांची संख्या लक्षणीय वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

सरकारी व्यतिरिक्त, खाजगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा देखील अहवाल देत आहेत. राज्यात मलेरिया चाचणीसाठी अनेक प्रयोगशाळा आहेत, परंतु डेंग्यू चाचणीसाठी 50 सेन्टीनल केंद्रे तयार केली आहेत, जिथे चाचणी केली जाते. मजबूत निदान आणि अहवाल प्रणालीमुळे, अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

डासांमुळे होणारे आजार अधिक

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वेक्टर बोर्न डिसीजचे प्रमुख डॉ. महेंद्र जगताप म्हणाले की, लोकांमध्ये होणाऱ्या एकूण आजारांपैकी 17 टक्के आजार हे डासांमुळे होतात. यावरून आजही डास चावल्यामुळे होणाऱ्या आजारांचा लोकांच्या आरोग्यावर किती परिणाम होतो हे दिसून येते. तसेच ग्रामीण भाग असो की शहरे, सर्वत्र डास असतात, पण 60 टक्के डासांमुळे पसरणारे आजार शहरांतून होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजही लोक टाक्यांमध्ये पाणी साठवतात. जर ते व्यवस्थित झाकले गेले नाही तर डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते.

प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सतर्क 

डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही एकमेकांच्या सोबतीने काम करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात. प्रशासन स्तरावर डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉगिंग आणि प्रजनन स्थळे शोधण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याच वेळी, सामान्य लोकांनी देखील स्वतःभोवती कचरा गोळा करू नये, विशेषत: ज्या ठिकाणी पाणी साचू शकते. टाकी झाकून ठेवावी, जेणेकरून डासांची पैदास होऊ शकत नाही. 

चार वर्षांतील सर्वाधिक प्रकरणे

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात किती रुग्ण आढळले, याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

2020 मध्ये 3 हजार 356

2021 मध्ये 12 हजार 720

2022 मध्ये 8 हजार 578

2023 मध्ये 17 हजार 541 

काय काळजी घ्यावी

- डेंग्यू आणि मलेरिया स्वच्छ पाण्यात होतो. त्यामुळे ठराविक कालावधीत पाणी बदलत राहते.

- पाणी झाकून ठेवा

- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

डेंग्यूची लक्षणे

ताप, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी आणि मज्जातंतू दुखणे, प्लेटलेट्स कमी होणे.