मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं

Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे

राजीव कासले | Updated: Feb 1, 2024, 02:43 PM IST
मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं title=

Trending News : लग्नाचा दिवस उजाडला, मंडप सजला नवरा मुलगा (Groom), त्याचं कुटुंब आणि नातेवाईक वाजतगाजत लग्न मंडपात आले. नवरा मुलाग मुंडावळ्या लावून स्टेजवर आला. पण तीन-चार तास उलटले तरी नवरी मुलगी (Bride) आलीच नाही. त्यामुळे नवरा मुलाच्या कुटुंबियांनी नवरी मुलीकडच्या लोकांकडे चौकशी केली. कारण कळल्यावर त्यांना धक्काच बसला. शेवटी लग्न न करताच मुलगा आणि वरात आपल्या घरी परतली. याप्रकरणी नवरा मुलाच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास केला जात आहे. 

उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये (Kanpur) ही घटना घडली. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. पण बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतलीच नाही. इथे नवऱ्या मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली. मुलीच्या घरच्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. नाश्ता-पाणीही झाला. लग्नाच्या आदिचे काही विधी पूर्ण करुन नवरा मुलगा जयमाला घेऊन स्टेजवर आला. दोनहीकडची मंडळी गाण्यावर नाचत होती. पण बराच वेळ झाला तरी स्टेजवर नवरी मुलगी न आल्याने सर्वांना धक्का बसला. 

मुलीच्या वडिलांना मुलीला फोन केला. त्यावेळी तीने आपल्याला लग्न करायचं नसल्याचं सांगितलं. तीन लग्नाला नकार कळवला. ब्युटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेली मुलगी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. मुलीच्या वडिलांनी ही गोष्ट मुलाला कळवली. कारण ऐकताच लग्न मंडपात एकच शांतता पसरली. मुलाकडची लोकं वरात घेऊन निघून गेले. तर मुलीच्या वडीलांना पोलिसात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींचं एका मुलावर प्रेम होतं. पण घरच्यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मुलगी लग्नाला तयार झाली. पण ऐन लग्नाच्या दिवशी ती प्रियकरासोबत गायब झाली. या प्रकरणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

लग्नमंडपाला लागली आग
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत लग्नाच्याआधी मंडपाला भीषण आग लागली. मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरमधली ही घटना असून नवरा आणि नवरी लग्न मंडपात दाखल झाले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. आगीची ठिणगी लग्न मंडपात पडली आणि संपूर्ण मंडपाला आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेने मंडपात एकच खळबळ उडाली. लग्नासाठी आलेली लोकं सैरवैर पळू लागली. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानाने अथक प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.