सलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?

विश्व सुंदरी असा किताब मिळवलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायची सगळ्यांनाच भुरळ पडते. तिचं सौंदर्य आणि तिच्या अदा प्रत्येकालाच घायाळ करतात. अशा ऐश्वर्याशी कुणाला लग्न करायचं नसेल?...

90 दशकात ऐश्वर्याचं नाव सलमानसोबत जोडलं गेलं. अगदी Made For Each Other प्रमाणे या दोघांची जोडी होती.

पण सलमान ऐश्वर्याचं नातं Toxic असल्याचं आपण ऐकलंच असेल. सलमान ऐश्वर्याबाबत खूप Possesive होता.. तो अनेकदा ऐश्वर्याला कंट्रोल करत असे...

सलमानचा हा स्वभाव ऐश्वर्या आणि त्याच्या नात्यात दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्याला अपमानास्पद वागणूक देणे यामुळे ऐश्वर्या अतिशय दुःखी होती. सलमानचं असं वागणं ऐश्वर्याच्या करिअरवर परिणाम करत होतं. त्यांच वेगळे होणं धक्कादायक होतं.

त्यानंतर ऐश्वर्याचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत जोडलं गेलं. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा झाली. पण ऐश्वर्यासोबत लग्न करणारा तो नव्हता...

पहिल्या अनुभवानंतर ऐश्वर्याला आपलं आयुष्य अतिशय खासगी ठेवायचं होतं. पण विवेककडून तसा अनुभव येत नव्हता...

नंतर विवेकने सगळ्या गोष्टी मीडियाला सांगितल्या आणि दोघांचं नातं तुटलं...

यादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याची मैत्री झाली. अभिषेकला 'कभी अलविदा ना केहना' या सिनेमादरम्यान ऐश्वर्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली.

अभिषेक कधीच ऐश्वर्याच्या स्टारडमने असुरक्षित नव्हता. तो कायमच ऐश्वर्यासोबत खंबीरपणे उभा होता. लग्नाच्या 16 वर्षांनंतरही या दोघांचं नातं अतिशय खास आहे.

VIEW ALL

Read Next Story