भार्गवी चिरमुले ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

नुकत्याच 'मीडिया टॉक'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं अनेक प्रकारचे खुलासे केले आहेत. यावेळी तिनं आपल्या आयुष्यातला तो कठीण प्रसंग सांगितला आहे.

यावेळी ती म्हणाली की ती गाडीनं रात्री प्रवास करत होती. ती रस्ता चुकली होती तेव्हा तिनं दोन बाईकवरील लोकांना पत्ता विचारला होता. परंतु थोड्यावेळानं तिच्या लक्षात आलं की ती दोघं तिचा पाठलाग करत आहेत.

त्यावेळी ती प्रचंड घाबरली होती. तिनं स्वत:ची खूप समजूतही काढली. सोबतच स्वत:ला शांत केले आणि मग शांतपणे गाडी चालवू लागली.

बाई म्हणून घाबरायचं नाही जे होईल ते होईल असा तिनं विचार केला. यापुढे ती म्हणाली की, ''ती दोन माणसं बाईक घेऊन बाजूने गेली. त्यावेळी मी त्यांना हात दाखवला आणि 'मी माझं शोधेन', असा त्यांना इशारा करून सांगितलं.''

''यानंतर ते दोघेही वेगळ्या रस्त्याने निघून गेले. ते कदाचित माझी मदतही करत असावेत. पण त्या दहा मिनिटांच्या काळात मी काय करू असा प्रश्न मला पडला.''

''त्यावेळी मी माझ्या आतून जो आवाज आला त्यामुळे मी ते करू शकले. माझ्यासाठी तो दहा मिनिटांचा काळ खूपच भयानक होता.'' असा अंगावर काटा आणणारा प्रसंग तिनं सांगितला.

VIEW ALL

Read Next Story