भारतातील 'हे' ठिकाणं आहेत धोकादायक!

Published by: Zee Team | Jul 01, 2024

रूपकुंड तलाव

उत्तराखंडमधील रूपकुंड तलाव हे कंकाल तलाव म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी शेकडो वर्ष जुने मानवी सांगाडे सापडल्याने हे ठिकाण अधिक धोकादायक बनले आहे.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

सिंधू खोरे

लडाखमध्ये असलेले सिंधू खोरे हे दुर्गम रस्ते आणि डोंगराळ भागांसाठी ओळखले जाते. येथील रस्ते अरूंद आणि उंच असल्याने प्रवास करणे जोखमीचे असते.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे बिबट्यांचा वावर असल्याने हे ठिकाण धोकादायक समजले जाते. बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या अनेक घटना इथे घडल्या आहेत.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

थार वाळवंट

राजस्थानमधील थारचे वाळवंट हे अति उष्णतेसाठी आणि वाळूच्या वादळासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वातावरण अतिशय उष्ण असते.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

सिंगभूम जिल्हा

झारखंडमधील सिंगभूम जिल्हा हा घनदाट जंगलाने विभागलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आढळून येतात. इथे अनेक हत्तींच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे हे ठिकाण अधिक धोकादायक बनले आहे.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

कच्छ प्रदेश

गुजरातमधील कच्छ या ठिकाणी सतत होत असलेल्या भूकंपामुळे हे ठिकाण धोकादायक मानले जाते. 2001मध्ये झालेल्या भूकंपामुळे या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

अंदमान आणि निकोबार बेटे

या ठिकाणी रहिवासी असलेले जारवा जमातीचे लोक बाहेरील जगाशी संपर्क साधत नाही . तेथील लोक बाहेरच्या लोकांना शत्रू मानतात. म्हणून तिथे जाणे धोक्याचे ठरू शकते.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

VIEW ALL

Read Next Story